शाळा कॉलेज चे नियम बदलले आत्ताचा राज्य सरकारचा मोठा निर्णय

Schools and colleges महाराष्ट्र सरकार सध्या राज्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध मोठे बदल करत आहे. अशामध्ये राज्य सरकारच्या शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. आणि त्या निर्णयासंदर्भात काही नियमावली सुद्धा तयार केलेली आहे. येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापासून ही नियमावली प्रत्यक्षात आणण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत.

शैक्षणिक नियमावली

तर मित्रांनो आज आपण या ब्लॉगच्या माध्यमातून नियमावली बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. शाळेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासता यावी, विद्यार्थी किती शाळेमध्ये उपस्थित आहेत किती गैरहजर आहेत आणि किती हजर आहेत. या संदर्भात शिक्षकांना माहिती घेण्यासाठी आता दिवसभरातून शाळेमध्ये तीन वेळेस हजरी घेतली जाणार आहे.

या हजरीचा उद्देश असा की शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये किंवा काही वेळांमध्ये मुले हजर राहतात की गैरहजर राहतात या संदर्भात माहिती तपासली जाणार आहे.

  • सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर पहिली हजेरी घेतली जाणार आहे.
  • त्यानंतर दुपारच्या जेवणानंतर दुसरी हजेरी घेतली जाईल .
  • तिसरी हजेरी म्हणजे शाळा सुटण्याच्या आधी हजेरी घेतली जाईल.

पालकांना एसएमएस द्वारे माहिती

जर कोणी एखादा विद्यार्थी मधल्या सुट्टीमध्ये शाळेतून पळून गेला, तर त्या संदर्भात माहिती आता पालकांना एसएमएस द्वारे दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची माहिती एसएमएस द्वारे दिल्या गेल्याने विद्यार्थी आणि शाळा पालक या सर्वांमधील संवाद आणि कम्युनिकेशन हे स्ट्रॉंग होईल आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाढेल.

शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

मित्रांनो आता नवीन तंत्रज्ञान बाजारात आलेले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे. शाळेमध्ये कॅमेरा बसवण्यासाठी काही जागा निश्चित करण्यात आलेले आहे, जसे की शाळेचे प्रवेशद्वार, शाळेच्या वर्ग खोल्यांच्या बाहेर, मैदानावर, स्वच्छतागृहांच्या बाहेर अशा विविध भागांमध्ये कॅमेरे लावले जाणार आहेत.

या सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे दररोजची दिवसभराची आणि संध्याकाळची शूटिंग होत राहील आणि ही शूटिंग महिनाभरासाठी ही संग्रहित केली जाईल.
जर काही भविष्यात घटना घडली तर या साठवलेल्या सीसीटीव्ही फुटेज द्वारे माहिती घेता येईल. सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने अनावश्यक घडणाऱ्या घटनांना आळा बसेल आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाढेल.

कर्मचारी निवडताना काटेकोरपणे तपासणी

सरकारने जो पुढील निर्णय घेतला आहे तो म्हणजे शाळेमध्ये कर्मचारी निवडताना त्यांची आता काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे. शाळेमध्ये शिक्षक, शिक्षेततर कर्मचारी यांसाठी आता पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे आवश्यक केले जाणार आहे.

जर तुम्हाला शाळेमध्ये नोकरी करायची असेल तर हे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे या प्रमाणपत्राशिवाय नोकरी मिळणार नाही. जर एखाद्या कर्मचारी नियुक्त झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील काही गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात आली तर त्याला तात्काळ नोकरीवरून काढले सुद्धा जाणार आहे.

विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य

सध्याच्या जगामध्ये स्पर्धा खूप वाढलेली आहे आणि लोकसंख्या वाढल्याने कमी जागांसाठी अधिक विद्यार्थी हे नेहमीच परीक्षेत येत असतात. या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक मनावर काही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून मानसिक आरोग्यावर सुद्धा आता सरकार लक्ष देणार आहे. मानसिक आरोग्य शैक्षणिक तणाव सामाजिक दबाव या सर्व गोष्टींना कसे हाताळायचे यासंदर्भात आता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

पालक आणि शाळा संवाद 

पालक आणि शाळा यांच्यामध्ये आता संवाद वाढवला जाणार आहे. विद्यार्थ्यांची प्रगती या सर्व गोष्टींबद्दल विद्यार्थ्यांची प्रगती उपस्थिती वर्तन या सर्व गोष्टींची माहिती आता पालकांना वेळोवेळी मिळणार आहे. जर एखादा विद्यार्थी शाळेमध्ये चांगले वर्तन करत नसेल किंवा त्याला मार्क कमी मिळत असतील तर अशा वेळेस पालकांना लवकर त्याची खबरदारी माहिती देऊन योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे.

या नवीन नियमावलीनुसार आता शिक्षकांवर सुद्धा मोठी जबाबदारी आलेली आहे. शैक्षणिक गुणवत्ता नेहमी आता शिक्षकांना वाढवणे वाढवावी लागणार आहे. ज्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढेल आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिक्षण मिळेल.

नवीन नियमावली मध्ये विद्यार्थ्यांची शारीरिक सुरक्षा मानसिक आरोग्य आणि शैक्षणिक प्रगती सामाजिक विकास या सर्व गोष्टींसाठी विविध योजना राबवल्या जाणार आहेत. या सर्व नियमावलीचे पालन आता शिक्षण संस्थांना करावे लागणार आहे.

Leave a Comment