Musaldhar paus in jun नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाचे दिवस आलेले आहेत. शेती क्षेत्रातील खरीप हंगाम आता जवळच आलेला आहे. जून महिन्यामध्ये हा हंगाम सुरू होतो आणि मे महिन्यात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी सुद्धा लावलेली आहे. काही ठिकाणी मान्सून येण्यापूर्वीच शेतामध्ये बी बियांची लागवड सुद्धा सुरू झालेली आहे. अशातच महाराष्ट्र क्षेत्रातील महत्त्वाचे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचा अंदाज वर्तवलेला आहे.
सध्याची हवामान परिस्थिती Current weather conditions
पंजाबराव डक हे महाराष्ट्रामध्ये हवामान अभ्यासक म्हणून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. यांनी दिलेला अंदाज नेहमी बरोबर येतो. म्हणून हे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असे व्यक्तिमत्व आहे. पंजाबराव डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या मध्यापर्यंत पर्यंतचा काळ हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या काळामध्ये जर शेतकऱ्यांनी पाहिजे ती सर्व तयारी केली, तर येणारा हंगाम हा शेतकऱ्यांसाठी यशस्वी होणार आहे.
पंजाबराव डोक्यांनी सांगितल्यानुसार 31 मे पासून सूर्याचे दर्शन सर्व शेतकऱ्यांना झालेले आहे आणि आत्ताच्या निरीक्षणा नुसार पुढील काही दिवस वातावरण कोरडे राहील असे दिसत आहे. हे कोरडे हवामान शेतीच्या मशागतीसाठी महत्त्वाच्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सर्व शेतीची मशागत करून घेणे आवश्यक आहे.
हवामान तज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार सध्याचा काळ हा शेतीमध्ये ओलावा असणार आहे. त्यामुळे शेतकरी बी बियाण्याची पेरणी करण्यासाठी हा काळ महत्त्वाचा असेल.
जमिनीची मशागत Land cultivation
31 मे ते 6 जून हा कालावधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे असे तज्ञांतर्फे सांगण्यात आलेले आहे. या काळामध्ये शेतकऱ्यांनी संपूर्ण जमिनीची तयारी करून घेणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही नांगरणी, वखरणी सर्व कामे करून घेतली पाहिजेत. जर या काळामध्ये जमिनीमध्ये ओलावा असेल तर तुम्ही या काळामध्ये पेरणी सुद्धा करू शकतात.
या काळामध्ये तुम्ही काही गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे.
- जसे की जमिनीचे खोल नांगरणी करून घ्या.
- मातीची योग्य ती वखरणी करून घेतली पाहिजे.
- खतांचा योग्य वापर आणि बियाणांची निवड याची तयारी सुद्धा तुमची झालेली पाहिजे.
जून महिन्यातील हवामान अंदाज Weather forecast for the month of June
हवामान अभ्यासाकांनी दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये 7 जून पासून पावसाला सुरुवात होणार आहे. 7 तारीख, 8 तारीख, 9 तारीख आणि 10 तारीख या दिवसांमध्ये राज्यांमध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या कालावधीमध्ये पडणारा पाऊस हा शेतीकामासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची पूर्ण तयारी करून ठेवणे आवश्यक आहे.
येणाऱ्या काळामध्ये पडलेल्या पावसामुळे जमिनीचा ओलावा वाढेल आणि बी लावण्यासाठी आणि बी बियाणे तयार करण्यासाठी संपूर्ण कालावधी हा उपयोगाचा ठरेल. ज्या शेतकऱ्यांची जमीन तयार नसेल अशी शेतकऱ्यांना यामध्ये अडचणी येणार आहेत.
खरीप हंगामा हंगामामध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये तुम्ही कापूस, हळद, मूग, उडीद अशा विविध पिकांची लागवड करता येते. जर तुम्ही मुगाची लागवड वेळेवर केली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल ते सध्या जमिनीमध्ये एक ते दोन फूट खोलीपर्यंत ओलावा आहे. त्यामुळे तुम्ही बी पेरणी करू शकता.
शेतकऱ्यांनी आता या मधल्या काळामध्ये खरीप हंगामासाठी लागणारे बी बियाणे यंत्रसामग्री या सर्व गोष्टी तयारी करून ठेवली पाहिजे. जेणेकरून योग्य वेळ येताच शेतामध्ये लागवड करू शकतात. तज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार मे महिन्याच्या 27 ते 28 तारखेपर्यंत संपूर्ण शेतकरी लागवड करून घेतील यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये सोयाबीन कापूस मूग या पिकांचा समावेश असेल.
पिकांची लागवड योग्यरीत्या होण्यासाठी तुम्हाला वेळापत्रकाचे पालन करावे लागणार आहे. शेतामध्ये कोणत्याही बियाणांची पेरणी करण्याआधी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाणांची गुणवत्ता आणि आवश्यक ती बीज प्रक्रिया करून घ्यावी.
दुसऱ्या टप्प्यातील हवामान अंदाज Second phase weather forecast
हवामान तज्ञांनी जून महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यातील पावसाचा सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे. पहिला टप्पा म्हणजे सात ते 10 जून च्या दरम्यान पहिल्या टप्प्यांमध्ये पाऊस पडेल त्यानंतर 13 ते 17 जून च्या दरम्यान परत एकदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या दुसऱ्या टप्प्यातील पावसामुळे खेडोपाड्यातील नदी नाले वाहण्याची शक्यता आहे. यांना पाणी येईल आणि जमिनीचा पाणी स्तर वाढेल. हवामान तज्ञांनी राज्यभरामध्ये राज्यव्यापी पावसाची शक्यता देण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी जून महिन्यापर्यंत पाऊस झालेला नाही, अशा ठिकाणी सुद्धा आता जून महिन्यामध्ये पाऊस पडण्याचे मोठी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
निसर्गाने दिलेलं संकेतानुसार कडुलिंबाच्या झाडावर मोठ्या प्रमाणात फळे आलेले आहेत त्यामुळे पावसाचे प्रमाण या काळामध्ये जास्त जाईल असे मानले जात आहे