Borewell subsidy नमस्कार मित्रांनो आज आपण राज्य सरकार तर्फे राबवल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती घेणार आहोत. राज्य सरकार तर्फे विविध योजना राबवल्या जातात. त्याच योजनांपैकी एक योजना म्हणजे तुमच्या शेतामध्ये बोरवेल खोदण्यासाठी सरकार आता अनुदान देणार आहे.
आपल्याला तर माहीतच आहे की शेतकऱ्यांसमोर पाणी टंचाई हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. पाण्याची उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि फायदा सुद्धा होतो.
महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी चालू केलेली आहे. या योजनेचे नाव म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना होय. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बोरवेल खोदण्यासाठी 50 हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेची उद्दिष्टे Objectives of this scheme
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे की आर्थिक मदत करून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोरवेल खोदणे आणि शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध करून देणे एवढे आहे. ही योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघे मिळून चालवतात.
या योजनेअंतर्गत तुम्ही शेतामध्ये नवीन बोरवेल खोदू शकता किंवा पहिल्याच असलेल्या जलस्त्रोतांची दुरुस्ती सुद्धा करू शकतात. शेतामध्ये बोरवेल घेतल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि आर्थिक स्थैर्य मजबूत होते. शेती क्षेत्र बळकट झाल्याने ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होते.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. आता तुम्ही हे अनुदान कुठे कुठे वापरू शकता या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. पहिलं म्हणजे की तुम्ही नवीन विहीर खोदण्यासाठी सुद्धा हे अनुदान वापरू शकता. विहीर खोदण्यासाठी लागणारे पैशांसाठी तुम्ही या योजनेची सुद्धा मदत घेऊ शकता.
शेतामध्ये बोरिंग करण्यासाठी सुद्धा तुम्ही या योजनेचा वापर करू शकता जेणेकरून तुम्ही जमिनीमध्ये खोलवर जाऊन पाण्याची स्त्रोत सापडू शकता. ही योजना प्रामुख्याने शेतामध्ये जल स्त्रोत तयार करण्यासाठी तयार केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही या योजनेअंतर्गत शेततळे सुद्धा निर्माण करू शकतात.
या योजनेअंतर्गत तुम्ही शेततळ्यामध्ये प्लास्टिक पणनी लावून सुद्धा पाण्याची बचत करू शकता. तसेच शेतामध्ये लागणारे सिंचन व्यवस्था जशी की ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा नवनवीन सिंचनांची पद्धत अवलंबून उत्पादन मोठ्या प्रमाणात घेऊ शकता.
या योजनेअंतर्गत तुम्ही बोरवेल मध्ये मोटर टाकने असेल किंवा विहिरीची दुरुस्ती असेल असेही कामांसाठी हे पैसे वापरू शकता.
योजनेसाठी पात्रता Eligibility for the scheme
- या योजनेचा लाभ फक्त अनुसूचित जमातीतील व्यक्तींनाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला वैध जातीचा दाखला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- उत्पन्नाच्या अटीमुळे खरोखर गरजू असणारे शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी झिरो पॉईंट 40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी जमिनीचा सातबारा तुमच्या नावावर असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे Required documents
या योजनेसाठी काही महत्त्वाचे कागदपत्रे लागतात जसे की ओळखीची कागदपत्रे
- ओळखीचे कागदपत्रे यामध्ये तुम्ही आधार कार्ड आणि इतर दस्तऐवज जे आहे ते वापरू शकतात.
- जातीचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला येथे देणे बंधनकारक केलेला आहे.
- तसेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला येथे जोडावे लागणार आहे.
- जमिनीच्या कागदपत्रांमध्ये तुम्हाला सातबारा आणि जमीन तुमची असल्याचा मालकी हक्क दाखवणारे कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत.
- तसेच तुम्हाला ज्या ठिकाणी विहीर बोर खांदायचा आहे त्या ठिकाणी पहिली कोणती विहीर बोर नसल्याचा सुद्धा पुरावा द्यावा लागणार आहे.
- तसेच ग्रामसभेमध्ये ठराव करून तो मंजूर करून तो तिथे तुम्हाला जमा करावा लागणार आहे.
ऑनलाईन अर्ज Apply Online
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तिथे गेल्यानंतर शेतकरी योजना या बटनावर क्लिक करा. या योजनेचे नाव सापडल्यानंतर आवश्यक ती माहिती भरा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा. समिट या बटणावर क्लिक करा आणि तुमचा अर्ज पूर्ण करा